त्या गावाला नव्हता कोणी एकच राजा आणि एकच राणी.
तिथे घरोघरी नांदत होते एकेक राजाराणी.
प्रत्येकाच्या दिलाची एकेक कहाणी, करी जीवाचं पाणीपाणी.
तरी सगळेजण नेहमी गायचे प्रेमाची गाणी.
प्रेमासाठी वाट्टेल ते,प्रेमासाठी कायपण! - असं म्हणतम्हणत,
प्रेमासाठी वाट्टेल ते,प्रेमासाठी कायपण! - असं म्हणतम्हणत,
होती ही माणसं जगत.
तरी त्यांना सापडत नसे प्रेम, कारण सगळ्यांचं वागणं सेमसेम.
कितीही गायली प्रेमाची गाणी, तरी कधीकधी ओढवायची आणीबाणी.
ते सगळे मोठ्या उत्साहाने साजरा करत एक दिवस आणि तो म्हणजे प्रेमदिवस. ह्या प्रेमाच्या दिवशी; जरी सगळे एकमेकांना भेटवस्तू देत, तरी त्यांचं मन काही नव्हते भरत. सारखी कसलीतरी टोचणी लागून राहत असे, कशाची तरी कमतरता भासत असे.
प्रेमदेवतांना हे सगळे प्रश्न पाहून आनंद झाला.
तरी त्यांना सापडत नसे प्रेम, कारण सगळ्यांचं वागणं सेमसेम.
कितीही गायली प्रेमाची गाणी, तरी कधीकधी ओढवायची आणीबाणी.
ते सगळे मोठ्या उत्साहाने साजरा करत एक दिवस आणि तो म्हणजे प्रेमदिवस. ह्या प्रेमाच्या दिवशी; जरी सगळे एकमेकांना भेटवस्तू देत, तरी त्यांचं मन काही नव्हते भरत. सारखी कसलीतरी टोचणी लागून राहत असे, कशाची तरी कमतरता भासत असे.
एकदा सालाबाद प्रमाणे असाच प्रेमदिवस आला. प्रेमाचा आठवडा सुरू झाला, तशा सगळीकडे प्रेमाच्या पताका लागल्या, छानछान भेटवस्तू विकायला आल्या, हदयाच्या आकाराचे फुगे हवेत तरंगायला लागले, पण पुन्हा अदृश्य टाचणीने ते फुटू लागले. लाल रंगाचे गुलाब बाजारात आले, मात्र त्यांचे अदृश्य काटे टोचू लागले.
एके दिवशी काय झाले, प्रेमदेवता आकाशातून विहार करीत होत्या. तेव्हा त्यांना दिसले की ह्या गावात प्रेमाच्या नावाने उत्सव सुरू आहे. म्हणून त्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी गावात उतरल्या. बघतात तर काय, सगळीकडे रंगीबेरंगी कपडे घातलेली, नटलेली, सजलेली माणसे फिरत होती – तरी कोणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, समाधान नव्हते.
एके दिवशी काय झाले, प्रेमदेवता आकाशातून विहार करीत होत्या. तेव्हा त्यांना दिसले की ह्या गावात प्रेमाच्या नावाने उत्सव सुरू आहे. म्हणून त्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी गावात उतरल्या. बघतात तर काय, सगळीकडे रंगीबेरंगी कपडे घातलेली, नटलेली, सजलेली माणसे फिरत होती – तरी कोणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, समाधान नव्हते.
प्रेमदेवतांनी माणसांची वागणूक जवळून बघायला सुरुवात केली.
तर त्यांना काय दिसले?
माणसे प्रेमाच्या नावाखाली एकमेकांना त्रास देत होती.
काही राजे प्रेम आहे म्हणून राणीच्या मागे-मागे जात, तिचा मोबाईल चेक करीत, तिची पर्स उघडून शोध घेत, आपल्याला आवडणारेच कपडे तिने घालावे म्हणून हट्ट करीत, राणीने आपल्या शिवाय इतर कुठल्याही राजाशी बोलू नये म्हणून तिला दटावत, आपल्या लाडक्या राणीशी मैत्री करणाऱ्या एखाद्या राजाला बदडून काढत. हेच आपलं तिच्यावरचं प्रेम आहे, असंही तिला सांगत! तिला इतर पुरुषांपासून दूर ठेवणं म्हणजेच तिचं संरक्षण करणं असंच प्रत्येक राजाला वाटे!
प्रत्येक राणीचीही अशीच तऱ्हा होती ! राजाची मर्जी मिळवायला प्रत्येक राणी प्रयत्न करत होती. त्याला चांगलंचुंगलं खायला घाले, त्याला आवडेल ते कपडे घाले, चेहऱ्यावर रंगरंगोटी करे, त्याने दिलेले दागिने अंगावर मिरवे. तीही त्याचं पाकीट तपासे, मोबाईल तपासे, तीही त्याच्या चौकश्या करे. आपल्या राजाला इतर बायकांपासून दूर ठेवलं तरच त्याचं आपल्यावरचं प्रेम शाबूत राहील – असं प्रत्येकीला वाटे!
राजा-राणी दोघंही अस्वस्थ असत,
काही राजे प्रेम आहे म्हणून राणीच्या मागे-मागे जात, तिचा मोबाईल चेक करीत, तिची पर्स उघडून शोध घेत, आपल्याला आवडणारेच कपडे तिने घालावे म्हणून हट्ट करीत, राणीने आपल्या शिवाय इतर कुठल्याही राजाशी बोलू नये म्हणून तिला दटावत, आपल्या लाडक्या राणीशी मैत्री करणाऱ्या एखाद्या राजाला बदडून काढत. हेच आपलं तिच्यावरचं प्रेम आहे, असंही तिला सांगत! तिला इतर पुरुषांपासून दूर ठेवणं म्हणजेच तिचं संरक्षण करणं असंच प्रत्येक राजाला वाटे!
प्रत्येक राणीचीही अशीच तऱ्हा होती ! राजाची मर्जी मिळवायला प्रत्येक राणी प्रयत्न करत होती. त्याला चांगलंचुंगलं खायला घाले, त्याला आवडेल ते कपडे घाले, चेहऱ्यावर रंगरंगोटी करे, त्याने दिलेले दागिने अंगावर मिरवे. तीही त्याचं पाकीट तपासे, मोबाईल तपासे, तीही त्याच्या चौकश्या करे. आपल्या राजाला इतर बायकांपासून दूर ठेवलं तरच त्याचं आपल्यावरचं प्रेम शाबूत राहील – असं प्रत्येकीला वाटे!
राजा-राणी दोघंही अस्वस्थ असत,
प्रेमाच्या शोधात फिरत,
शब्दांच्या भोवऱ्यात भिरभिरत,
देवाणघेवाणीच्या विळख्यात अडकत,
तरी प्रेम कुणालाच नसे सापडत.
कोणाचाच कोणावर विश्वास नव्हता. स्वत:चा स्वत:वरही विश्वास नव्हता. एकमेकांवर संशय घेणे, हाच त्यांना आपल्या प्रेमाचा पुरावा वाटत होता.
आपलं प्रेम आहे म्हणजे तरी काय आहे?
- हे कुणालाच समजत नव्हते.
हे सगळं पाहून प्रेमदेवता दु:खी झाल्या.
हे सगळं पाहून प्रेमदेवता दु:खी झाल्या.
ह्या माणसांना प्रेमाचा खरा अर्थ कसा समजावून द्यावा ते त्यांना कळेना!
मग त्यांनी एक युक्ती केली.
मग त्यांनी एक युक्ती केली.
त्यांनी एक संदेश बनवला आणि सगळ्यांच्या फोनमध्ये पाठवून दिला. प्रेमदेवतांनी म्हटलं होतं -
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे, नुसतंच प्रेम नसतं. तुमचं आणि त्यांचं मुळीच सेम नसतं.”
हा संदेश वाचून सगळे चक्रावले ! हा जगावेगळा संदेश कोणी पाठवला, कुणाला समजेना.
जो तो ज्याला त्याला विचारू लागला, जी ती जिला तिला विचारू लागली.
पण कुणाला काहीच माहीत नव्हते.
काहींना ती कसलीशी जाहिरात वाटली, काहींना ती नवी कविता वाटली,
काहींना गंमत वाटली तर काहींना भीती वाटली.
काहींनी तो संदेश डिलिट करून टाकला.
पण काहींनी धीर करून त्या संदेशाला उलट प्रश्न केले ,
“प्रेम म्हणजे नक्की काय असतं?”
“मला माझंमाझं प्रेम कसं मिळेल?”
“माझं प्रेम मला कसं कळेल?”,
“प्रेमासाठी काय करायला पाहिजे?”
प्रेमदेवतांना हे सगळे प्रश्न पाहून आनंद झाला.
काही माणसांना तरी प्रेमाचा अर्थ समजून घ्यायची इच्छा आहे, ते पाहून त्या खूष झाल्या.
मग त्यांनी उत्साहाने या नव्या प्रश्नांना उत्तरं द्यायला सुरुवात केली.
“प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे स्वातंत्र्य”
“प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे स्वातंत्र्य”
“ खरं प्रेम हवं असेल, तर एकमेकांवर भरवसा ठेवा.”
“ प्रेम म्हणजे मालकी हक्क नव्हे, प्रेम म्हणजे समर्पण नव्हे”
“खरं प्रेम हवं असेल तर जातीपातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, लिंगभेदाच्या भिंती तोडा”
“ प्रेम म्हणजे समतेचा विचार, प्रेम म्हणजे नाहीत गुलाब आणि हीऱ्यांचे अलंकार”
“प्रेम म्हणजे जवळीक, प्रेम म्हणजे मोकळीक”
प्रेमदेवतांच्या अशा नव्यानव्या संदेशांनी सर्वांचे फोन भरून गेले.
पण हे भलतेसलते संदेश पाहून प्रश्न विचारणारे मात्र भांबावून गेले.
त्यांना ह्या संदेशांचा अर्थच लागेना.
त्यांनी आपापल्या फोन कंपन्यांच्याकडे तक्रारी केल्या.
प्रेमाच्या आठवड्यात ऐनवेळी असा गडबडघोटाळा होणं कुणालाच परवडणार नव्हतं,
फोन कंपन्यांनी सगळे संदेश डिलिट करून टाकले.
हे संदेश येतायत कुठून, त्याचीही त्यांनी शोधाशोध सुरू केली.
नवीन तंत्रज्ञान कामाला लावलं. पण कुणालाच ह्या विचित्र संदेशांचा माग काढता येईना.
आपल्या साध्यासोप्या संदेशांमुळे असा काही गोंधळ उडेल यांची प्रेमदेवतांना कल्पनाच नव्हती. माणसांच्या नव्या तंत्रज्ञानाचा सामना करायचा असेल तर आपल्याला नवीन अस्त्र शोधायला पाहिजेत, माणसांना समजेल अंशी आणखी सोपी भाषा शिकायला पाहिजे – हे त्यांच्या लक्षात यायला लागलं.
त्यासाठी पुढच्या वर्षी नवीन कुमक घेऊन परत यायचं ठरवून प्रेमदेवता आल्या तशा परत निघून गेल्या.
पण काही माणसांच्या मनात त्यांनी पाठवलेले संदेश रुजले होते.
ही माणसं आपापल्या प्रेमाच्या कल्पनेवर नव्याने विचार करायला लागली होती.
त्यांच्या कुठल्याच प्रश्नांची पुरेशी उत्तरं मिळाली नाहीत, तरी नवीन प्रश्न त्यांच्या मनात उगवले होते.
पुढच्या वर्षी प्रेमदेवता येतील तेव्हा त्यांना नव्या प्रकारच्या प्रेमाचे अंकुर पाहायला मिळतील का?
वंदना खरे
संपादक, 'पुन्हास्त्रीउवाच'
वाह सुंदर कथा आहे मॅम...
ReplyDeleteअगदी इसापनीतीसारखी कथा आहे। फारच छान!
ReplyDeleteथॅंक यू छाया
ReplyDeleteनवरा बायको मित्र मंडळ अशी मंडळे सुरू करण्याची कल्पना सुचली। फारच छान कथा,योगायोगानि दोनच दिवसा पुर्वी ह्या विषयावर चर्चा झाल्या होत्या। चीयर्स वंदना, ग्रेट
ReplyDeleteThank You !
Deleteमंडळ
सुरू केलं की कळवा.